The attacks on Rangoli, internet warrior and Happy Diwali!!! (रांगोळीवरील हल्ले, इंटरनेट योद्धा आणि दिवाळीच्या शुभेच्छा !!!)

(English translation is below, just scroll down)

(Though this is based on a true event, to maintain the privacy of the involved families, few details are changed).







आम्ही नऊ मजल्याच्या इमारतीत राहतो, प्रत्येक मजल्यावर चार फ्लॅट आहेत.

तळ मजल्यावर, एक कुटुंब राहते, दररोज सकाळी त्या घरातली गृहिणी आश्चर्यकारक रांगोळी काढण्यासाठी त्यांच्या फ्लॅटच्या मुख्य दरवाजाच्या समोर 15 ते 30 मिनिटे घालवते. 

हि रांगोळी अर्थातच रोज नवी असते आणि रोज साध्या पद्धतीने आणि पांढऱ्या रंगातच असते, फक्त एखादा सण असेल तर किंचित मोठी डिझाईन आणि इतर रंग वापरलेले असतात. अगदी कमी जागेत  त्या बाई छान रांगोळी काढतात.

पायर्‍यांपासून त्यांचा फ्लॅट अगदी लांब आहे म्हणून त्यांची रांगोळी इतरांसाठी कधीच अडथळा बनली नाही. इतर लोक  त्यांच्या  रांगोळीकडे न पाहताहि सहज पायऱ्या वापरू शकतात.

आमच्या बिल्डिंग मध्ये माझी आई आणि इतर काही स्त्रियाहि स्वतःच्या  घराच्या अंगणात रांगोळी काढतात, पण ही महिला एक उत्तम रांगोळी कलाकार आहे. त्यांच्या  डिझाईन्स, रंगांची निवड त्यांच्या  प्रत्येक रांगोळीला एक उत्कृष्ट कलाकृती बनवतात. बहुतेक सगळेच शेजारी पाजारी त्यांच्या रांगोळी कौशल्याचे कौतुक करतात आणि बर्‍याच स्त्रिया त्यांच्या रांगोळीचे फोटो नेहमी क्लिक करतात.

या दिवाळीत आमच्या इमारतीत काहीतरी वेगळच घडलं आणि त्याचा केंद्रबिंदू ह्या बाईंची रांगोळी असेल असं कधीही कुणालाही वाटलं नसेल.

मी दिवाळीच्या सुट्टीत घरीच होतो, सकाळी सकाळी मी किराणा सामान विकत घेण्यासाठी बाजारात गेलो आणि परत येताना मी पायऱ्या चढत होतो; तळ मजल्यावर मी त्या बाईंना एक अतिशय सुंदर रांगोळी काढताना पाहिल. मी त्या कलाकृतीचे कौतुक करण्यापासून स्वत: ला रोखू शकलो नाही.

मी त्यांना म्हणालो  “मावशी, तुमच्या रांगोळ्या काय अप्रतिम असतात हो, तुम्ही रांगोळी स्पर्धांमध्ये भाग घेतलाच पाहिजे. तूम्ही अजून मोठ्या डिझाईन्स का बनवत नाहीत? ”त्यावर त्या हसत म्हणाल्या, “थँक यु, पण आमची घरातली कामं काही कमी आहेत का? ती काही संपता संपत नाहीत,  मग मी मोठ्या रांगोळ्या कधी काढणार? आणि तसाही काही उपयोग नाहीये? .... आता दुपारचे सगळे दरवाजे बंद झाले कि एक आपल्याच बिल्डिंग मधला मुलगा येतो आणि जाणूनबुजून रांगोळी पुसतो. मी त्याला हे बर्‍याच वेळा करतांना पाहिले आहे परंतु त्याला रंगे  हात पकडला नाही, पण आज ना उद्या मी त्याला नक्की रंगे हात पकडेन, बघ तू”

मला आश्चर्य वाटले आणि धक्काहि बसला. “काय बोलताय मावशी? अशी छान कलाकृती नष्ट करणारा मुलगा कोण असेल? पालकांनी आपल्या मुलांना कसे वागावे हे शिकवले पाहिजे, रांगोळीने कुणाचे काय बिघडवले - आश्चर्य आहे? ”मी म्हणालो.

ती म्हणाली “मला काही कल्पना नाही. मी नेहमीच काळजी घेते की माझ्या रांगोळीचा कुणालाही अडथळा होणार नाही; कितीही मोह झाला तरी मोठी रांगोळी काढून रस्ता अडवत नाही ”

मी म्हणालो “मी सहमत आहे, असो... तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा” माझी कधी मदत लागलीच  तर मला कळवा. ”

त्या हसून म्हणाल्या, “तुलाही दिवाळीच्या शुभेच्छा, आणि अनेक आशीर्वाद”.

मी घरी पोहोचलो, याबद्दल आई आणि बायकोला सांगितले. माझ्या आईने सांगितले की तिची रांगोळीदेखील बर्‍याचदा त्या मुलाने पुसली आहे परंतु तिला फक्त त्या बाईसाठीच वाईट वाटते कारण आईला वाटत कि त्या मावशींची रांगोळी हि जास्त भक्तिभावनेने केलेली असते आणि खूप परिश्रमहि घेतलेलं असतात. पण मी म्हणालो की रांगोळी कुणाचीही असो जर ती कुणाच्या रस्त्यात येत नसेल तर खोडसाळ पणे रांगोळी पुसण्याचा अधिकार कुणालाही नाही.

दुपारी जेवण संपल्यावर मी माझा मोबाईल बघत होतो आणि माझ्या घरचे टीव्ही वर काहीतरी  पहात होते. मला फेसबुकवर एक पोस्ट सापडली - ती पोस्ट केरळची होती - ती एका हिंदूंच्या घरची सीसीटीव्ही फुटेज होती, त्या बंगल्याच्या प्रवेशद्वाराजवळ एक सुंदर रांगोळी काढली गेली होती, अचानक मुलांचा एक गट आला, ते सर्वजण विशिष्ट टोप्या घातलेले होते आणि त्यांनी अगदी खुनशीपणे ती रांगोळी पुसली. ती फेसबुक पोस्ट एक सोपा प्रश्न विचारत होती - “हिंदू मुलांनी अन्य एखाद्या धर्माच्या कलाकृतीला असे केले असते तर किती निषेध केला गेला असता याचा अंदाज लावता येईल का, हेच जर हिंदू मुलांनी अगदी एकदाच आणि अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातही केलं ना तर आख्या देशाला आणि सगळ्या हिंदूंना काय काय ऐकावं लागेल?” मी काही त्या पोस्ट ला लाईक वगैरे  केल नाही किंवा त्या पोस्टवर काही भाष्यहि केले नाही.

आणि मग आम्ही वरच्या मजल्यावरून मोठं मोठ्याने भांडण्याचा आवाज ऐकला. काय झालंय हे पाहण्यासाठी आम्ही सर्व तिथे धावलो. तळ मजल्यावरील त्या बाई तिसर्‍या मजल्यावरील एका बाईकडे तक्रार करीत होत्या की, दररोज त्यांचा मुलगा मुद्दाम रांगोळी पुसून टाकतो, आणि आज तिने त्या मुलाला रंगेहाथ पकडलाय. तिसर्‍या मजल्यावर राहणारी ती महिला इतर धर्मातील आहे जे दिवाळी साजरी करत नाहीत आणि आपल्या मुलाच्या या आगाऊ कृत्याबद्दल दिलगिरी व्यक्त करण्याऐवजी आणि स्वतःच्या मुलालाही असे वागू नये हे समजावून सांगण्याऐवजी - ती वरच्या मजल्या वरची बाई उद्धट पणे ओरडत होती कि तुम्ही घराच्या आत रांगोळी का काढत नाही, दारात का काढता? अंगणात रांगोळी बनविणे थांबवलेच पाहिजे.

हा वाद चालूच होता, त्या मुलाचे संपूर्ण कुटुंब खूपच आक्रमक होते आणि अखेरीस तळमजल्यावरील त्या बाई आणखी वाद घालू शकल्या नाहीत आणि अश्रू ढाळत राहिल्या. आम्ही सर्वांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला परंतु त्या मुलाच्या कुटूंबाचा उद्धटपणा आणि आक्रमकता खूप होती ते काही समजावून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते, तुम्ही घराबाहेर रांगोळी काढणे हेच कसे चुकीचे आहे हेच ते सांगत होते. अनेक वयोवृद्ध शेजार्‍यांच्या विनंतीनुसार आम्ही त्या रांगोळी काढणाऱ्या बाईंना परत तळ मजल्यावर तिच्या घरी घेऊन गेलो, आम्ही सर्व तिथे एकत्र जमलो आणि चर्चा केली की त्या मुलाच्या कुटूंबाशी वाद घालण्यात काही अर्थ नाही परंतु आपण रांगोळी काढणे काही थांबवू नये - उलट आपण सर्वांनीच एकमेकांच्या रांगोळीवर लक्ष ठेवून तो मुलगा परत असं करणार नाही हे पाहिलं पाहिजे.

जेव्हा मी घरी परत गेलो आणि पुन्हा फेसबुक चेक करत होतो. तीच पोस्ट पुन्हा दिसू लागली - ती फेसबुक पोस्ट एक सोपा प्रश्न विचारत होती - “हिंदू मुलांनी अन्य एखाद्या धर्माच्या कलाकृतीला असे केले असते तर किती निषेध केला गेला असता याचा अंदाज लावता येईल का, हेच जर हिंदू मुलांनी अगदी एकदाच आणि अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातही केलं ना तर आख्या देशाला आणि सगळ्या हिंदूंना काय काय ऐकावं लागेल?” - या वेळी मात्र मी Like वर क्लिक केलंच, आणि मी देखील त्या पोस्टवर भाष्य केल / comment केली की “खोट्या पुरोगामी आणि एककल्ली नाटकी सहिष्णू गॅंग च्या खोटेपणाचा हिंदूंना वीट आला आहे” आणि काही मिनिटांतच इतर धर्मातील एका फेसबुक वापरकर्त्याने माझ्या टिप्पणीवर स्वतःची comment टाकली “आला आणखी एक हिंसक हिंदू इंटरनेट योध्या उगवला”- त्यावर पुन्हा मी काही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही, कारण मला माहित आहे की मी हिंसक नाही, मी सर्व धर्मांचा आदर करतो आणि  पूर्वग्रह दूषित असणाऱ्या लोकांशी वाद घालण्यात काय अर्थ आहे?... मला हसू मात्र आलं, काय पण नाव मिळालं मला.... म्हणे इंटरनेट योद्धा......." असो हे नाव असुदे कि हे युद्ध दोन्हीही आमच्यावर लादलेलं आहे, आम्ही काही स्वेच्छेने घेतलेलं नाही......

मग मी त्याला smily सहित एक उत्तर दिलं दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.... आणि हो आम्ही सगळेच आता छान छान रांगोळ्या काढतोय बरं का, अगदी रोज :)







The attacks on Rangoli, internet warrior and Happy Diwali!!!

(Though this is based on a true event, to maintain the privacy of the involved families, few details are changed).

We stay in a nine story building, on each floor there are four flats.

On the ground floor, there stays a family, each morning the lady of the house spends 15 to 30 minutes at the entry point of their flat’s main door to draw amazing Rangoli.

Depending on the day the size of Rangoli changes, normally it’s a small white color design occupying hardly one square foot area and if it’s any festival day then the design gets bigger up to 2 to 4 square feet area with beautiful colors added in it.

Their flat is little inside and away from the stairs so her Rangoli designs have never become obstacle for others, only those who are actually going to enter in her home will be actually closer to that Rangoli. Others can easily use stairs to go up without even looking at her Rangoli.

Even my mother and other few ladies draw Rangoli in their house courtyard, but this lady is an amazing artist. Her designs, selection of colors make each of her Rangoli a masterpiece. Entire neighborhood appreciates her Rangoli skills and many ladies always click photos of her Rangoli designs.

This Diwali something significant happened in our building…..

I was on Diwali vacation and was at home, early morning I went to market to buy some grocery items and on my return when I was climbing up the stairs; on the ground floor I saw that lady making an extraordinary Rangoli design. I could not stop myself from praising that artwork.

I told her “Masi (Aunty), it’s an extraordinary design, you must participate in Rangoli competitions. Why don’t you make even bigger designs?” on that she smiled and said “Thank you son but I have so much housework to do, so I can’t give more than 15 to 30 minutes for bigger Rangoli making, anyways what is the use?.... now a days in afternoon when every door is closed, a boy intentionally wipes Rangoli. I have seen him doing it few times but could not catch him red-handed, I am determined to catch him sooner or later.”

I was surprised and shocked. “What are you saying Masi? Who would be that boy who enjoys destroying such an artwork? Parents must teach their kids how to behave, after all Rangoli is such a beautiful & harmless artwork, what problem it could cause to someone?” I said.

She said “I have no idea. I always ensure that my Rangoli designs are not disturbing anyone’s path; I ensure that they are placed in corner. They only add the beauty and do not harm anyone.”

I said “I agree, do let me know if I can help, Happy Diwali”.

She smiled and said “Happy Diwali to you too son, bless you”.

I reached home, told my mother & wife about it. My mother said even her Rangoli is intentionally wiped by same boy many times but she feels bad only for that lady because that lady’s Rangoli is no less than a beautiful creation made out of devotion & a lot of hard work, where as my mother’s Rangoli designs are small and quick easy ones, I said that doesn’t give anyone right to just come and wipe them.

In afternoon we finished our lunch, I was checking my mobile phone and my family was watching television. I found a post on Facebook – post was from Kerala – it was CCTV footage of a Hindu house, a beautiful Rangoli was drawn at the entrance of that bungalow, suddenly a group of boys came, all wearing caps and they disgracefully wiped that Rangoli with their shoes. The act was intentional, cruel & was full with hatred. That Facebook post was asking a simple question – “Can you guess how much the protest would be if Hindu boys would have done this to some other religion’s artwork?” I did not click on like or did not make any comment on that post.

And then we heard loud noise from the upper floor. We all rushed there to see what went wrong. The lady from the ground floor apartment was complaining to the lady staying on the third floor that everyday her son has been deliberately destroying the Rangoli, today she caught the boy red-handed. The lady staying at the third floor is from other religion who do not celebrate Diwali and rather than apologizing for her son’s disgraceful act and rather than making her own son understand that he should not behave like that – that lady was arrogantly shouting on the other lady from the ground floor that why she can’t make Rangoli inside of her house? She must stop making Rangoli in the courtyard.

The argument was going on for quiet sometime, the entire family of that boy was very aggressive and eventually the lady from the ground floor was in tears as she could not argue with them anymore due to their abusive behavior. We all tried to intervene but the arrogance, aggressiveness of that boy’s family was too much to handle. As requested by many elderly neighbors we took that lady back to her home on the ground floor, we all gathered there and discussed that there is no point in arguing with that boy’s family but we must not stop making Rangoli – rather we all should keep making them and keep a watch, help each other to stay united and let no one destroy the Rangoli as well as the peace in our building.

When I went back home and was going through Facebook again. Same post reappeared - That Facebook post was asking a simple question – “can you guess how much the outrage would be if Hindu boys would have done this to some other religion’s art work?” – and I just clicked on the like button, I also commented on that post that “selective outrages, biasness of the liberal & secular gang is breaking the hearts of real secular Hindus – it is really upsetting” and within a few minutes a Facebook user from other religion than mine commented on my comment stating “here comes a Bhakta the violent Hindu nationalist, an internet warrior” – again I did not react, because I know I am not violent, I respect all religions and I understand that there is no point in arguing with those who have stubborn prejudice. Internet warrior – well both are forced on us aren’t they? This name as well as the war.....

Then I replied to him with a smily and a comment "Happy Diwali"
And yes we all are making rangolis each day.....

दिवाळीत पुण्यातल्या आचार्य अत्रे सभागृहात जाऊन पुस्तक आणण्या सारख वेगळं सुख नाही








खरंय अगदी... So many books and so little time.

माझी अवस्था अगदी अशीच होते एखाद्या पुस्तक प्रदर्शनात गेल्यावर किंवा पुस्तकांच्या दुकानात गेल्यावर. आणि दिवाळीत पुण्यातल्या आचार्य अत्रे सभागृहंत जाऊन पुस्तक आणण्या सारखा वेगळं सुख नाही. गेली कित्येक वर्ष दिवाळीत एकही फटाका न आणता, अगदी साधी फुलबाजीहि न उडवता आम्ही नेहमी प्रत्येक दिवाळीत भरपूर पुस्तक आणतो आणि त्या पुस्तकांचा जल्लोष त्या फटाक्यांच्या तुलनेत वर्षानुवर्षे चालूच असतो.

वेग वेगळ्या विषयांना स्पर्श करणार, मराठीच नव्हे तर भारतातल्या आणि जगातल्या अनेक प्रसिद्ध लोकप्रिय लेखकांचं साहित्य एकाच छताखाली वाचायला मिळणं हे काही एखादा मोठा खजिना लाभण्यापेक्षा कमी नाही. हा आनंद जगावेगळाच. पुस्तकप्रेमीच हा आनंद समजू शकतात.

फार अडचण असली तर चार पुस्तक कमी घेऊ आणि शक्य असेल तर भरपूर असं करत हि दिवाळीतली पुण्याच्या अत्रे सभागृहातील दिवाळी पुस्तक प्रदर्शनाची वारी कधी चुकवली नाही.

ऐन लक्ष्मी पूजनाच्या काळात सरस्वतीचं असं सुंदर दर्शन घडवणार ते एक शारदा मंदिरच नाही का? हजारो पुस्तक आणि शेकडो वाचक असं समीकरण झाल्यावर कितीही गर्दी झाली तरी तिथे एक लोभस शांतता असते आणि ती वाचन योगाची असीम शांती अतिशय मनमोहक असते.

पुस्तकात हरवलेले तिथले अबाल वृद्ध हेच सिद्ध करतात कि साहित्याचा पिढ्यान पिढ्या वाहणारा हा प्रवाह अनंत आहे, अनेक वळणं घेत नव्या नव्या स्थानांना भेट देत तो अखंड वाहतच असतो, आपल्या छोट्याशा ओंजळीत आपल्या कुवती प्रमाणे आपण त्याचं तीर्थ घ्यायचं आणि पुन्हा त्याच अनंत प्रवाहात त्याचंच अर्ध्य द्यायचं... इदं न मम् म्हणत..... Happy Reading :) वाचाल तर वाचाल ना !!!

Spread the word – show our respect to our dear deity.

We are witnessing posts, images & videos here and there on situation at the seashore, rivers, near lakes post Shree Ganesh Idol immersion / Visarjan. 

We all need to do more on this issue.




First of all – those who are worshiping big Murtis & Idols and immersing them in water bodies need to understand that the real Shree Ganesh Chaturthi vrat or Pooja is all about worship, bhakti, saadhna and love for god, the vrat doesn’t talk about such big Murtis or Idols - it talks about small pratima or Murti or Idol which is handmade and after immersion or visarjan should completely dissolve in water.

What is currently happening is very heartbreaking. People are not realizing that what they are doing with the Idols or Murtis is disrespectful towards those Idols.

Real Pooja is where we create a Murti or Idol and then do praan pratishtha means we invite the supreme godly power through the five elements / panch mahabhuta who are representing that godly power to come & be present in that Idol or Murti. 

Once this praan pratishtha is done then we perform other pujas, we pray, we celebrate, we feel happy and make others happy, sharing Prasad or Naidaidya is that feeling of sharing happiness, joy sharing the blessings. And then we do aarti – aart means passionate & from bottom of our hearts - so aart kariti iti aarti. That is our communication with god from our hearts as in most of the aartis we sing glories to god and we ask god to protect us, give us good health, wealth & wisdom. This is the overall pooja summary. But what we are doing is we are celebrating with the  big Murtis or Idols with all chemical colors, and then irresponsibly we immerse them in river or sea or lake without even taking ownership of what happens post that.

There are so many videos & images where we can see the government employees who are supposed to clean that are not treating those idols with respect. 

What we can see that after the visarjan the beach is full with the broken idols and those are not at all treated with respect.

Are we not responsible for those Idols or Murtis post Ganesh Visarjan?
Why very few people are bothered about it? Why so many still doing that though they can see whats happening to Idols or Murtis post viasarjan?

Its really commendable that  many people are coming forward and starting with eco friendly idols & murtis - thats what even the real vrat is expected to be done, they are doing visarjan / immersion at home.

Advertisement from Chitale  https://youtu.be/l3YEkYepTeM is very good & important, it is in alignment with the Dharma, Adhyatma (real Hinduism & its Spirituality). We all need to work on this.

If we go back in history and check we will see that number of people who bring a Ganesh Idol at home and celebrate Ganesh Festival is increasing – in past say fifty years back or hundred years back there were only few families from particular region & community who used to bring Ganesh Murtis or Idols & celebrate Ganesh Festival – later Lokmaanya Tilak made this festival a social event – his intentions were all good, as British rulers did not allow common Indians to gather and talk & discuss about freedom – Tilak used this religious event as an opportunity to gather people and accelerate the freedom movement.

This festival has given us many good leaders, even many artists have got opportunities in this festival to show case their talent. 

This festival gives an opportunity to celebrate our heritage, I love Pune anyways but during Ganesh Festival Pune becomes a different land – the beauty, the joy and the contagious enthusiasm in Pune during these days is unparalleled.

We strongly need to preserve our culture, spread the good things and enjoy. But we must stop bad practice. We should have big group recitation of Atharvshirsh, Aarti, more functions, cultural activities but we should stop this improper treatment of the Murtis or Idols post Visarjan / immersion. That is our responsibility. That is our duty. What kind of worshipers we are if we let that happen?

Let us work together on promoting the eco friendly Murtis or Idols which will get dissolved in water easily – that too at home. Let us all use pure water, put chandan and flowers in it and then do the visarjan – later add that soil to trees – spread it in gardens and then through those plants, through those flowers & trees Shree Ganesh will bless us forever.

Spread the word – show our respect to our dear deity.  










चितळ्यांची जाहिरात, सन्मानपूर्वक विसर्जन आणि एक नवी सुरुवात…..


चितळ्यांची जाहिरात, सन्मानपूर्वक विसर्जन आणि एक नवी सुरुवात…..


(Same article is also in HINDI.. just scroll below)




श्री गणेशाचा उत्सव भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात खूप हौसेने साजरा केला जातो. इतकच नाही तर जिथे जिथे सनातन हिंदू धर्माचे पालन करणारे आहेत तिथे तिथे गणेशोत्सव साजरा केला जातो.

आमच्या कडेही श्री गणेशाची स्थापना केली जाते, गणेशोत्सवाबरोबर माझ्या अनेक आठवणी जोडलेल्या आहेत. किमान एक महिना आधी पासून श्रींच्या सजावटीची तयारी करणे, ते सगळे सामान आणण्यासाठी बाजारात चकरा मारणे, सगळ्यांनी मिळून घराची साफ सफाई करणे, गणेश चतुर्थी च्या एक दिवस आधी तर घर अगदी लगीन घर बनून जात. प्रत्येक जण काहीतरी तयारी करीत असतो, मोदकांची आणि इतर नैवैद्याची तयारी, फुलं, हार बनवणे, आरतीची तयारी करणे, रांगोळी, पारंपारिक पोशाख, दुर्वा, कमळ आणि असच काय काय... श्रींच्या प्रतिमेला स्वतःच्या हातून घरी आणणे  हा एक आनंददायी अनुभव असतो, ते दिवसच वेगळे असतात. त्या एकामागून एक आरत्या आणि वेगवेगळे प्रसाद. स्वतःच्या घरची आरती करून, शेजारच्यांच्या घरची आरती मग सोसायटी ची आरती, त्या नंतर वेग वेगळ्या मंडळांना भेट देउन तिथली आरास बघणे आणि श्रींच्या वेग वेगळ्या रूपांचे दर्शन घेणे.

या उत्सवाने अनेक नेते घडवले - त्यांना लहान पणा  पासून उत्सव आयोजनातून नेतृत्वाचे धडे मिळाले, या उत्सवाने अनेक कलाकार हि दिले - आपापल्या सोसायटी, कॉलनी आणी आप्त मित्र परिवारासमोर आपल्या कलेचे प्रदर्शन करून या कलाकारांनी पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन मिळवले, मुळात या उत्सवाने सुरवाती पासूनच समाज कल्याण आणि समाज प्रबोधनासाठी प्रेरणा दिली.

केवळ काही परिवार किंवा समुदायाचा कुलाचार किंवा व्रत असणारा  हा गणेश उत्सव लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक केला. पारतंत्र्यात असताना ब्रिटिशांनी आपल्यावर अनेक बंधने टाकली होती. लोकांना एकत्र आणून स्वातंत्र्याच्या गोष्टी करणे तर अशक्यच होते. परंतु श्री लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सार्वजनिक करून त्या निमित्त एकत्र झालेल्या लोकांमध्ये स्वातंत्र्याची मशाल पेटवली आणि लोकांना प्रेरणा दिली, मार्ग दाखवला.

पण गेल्या काही वर्षांपासून हा उत्सव बदलला आहे, बदल हि तर कधीही थांबणारी गोष्ट आहे. काही बदल हे चांगले असतात तर काही बदल मात्र प्रश्न निर्माण करतात. या उत्सवाचेही अनेक चांगले अंग आहेत तर काही भाग मात्र विचार करायला लावणारा आणि चांगल्या बदलाची मागणी करणारा आहे. सर्वात दुःखदायक काही असेल तर ते चुकीच्या पद्धतीने सर्रास होणारे विसर्जन.

हा अत्यंत संवेदनशील विषय आहे.

मला कुणाच्याही धार्मिक भावना दुखवायच्या नाही, मी स्वतःच दुखी आहे, याचे कारण म्हणजे मागच्या काही वर्षां पासून आपण चुकीच्या पद्धतीने होणारे विसर्जन पाहत आहोत. दर वर्षी अस्वस्थ करणारे फोटो आणि विडिओ येतात. मी एक विडिओ पहिला ज्यात सरकारी कर्मचारी एका ट्रक मध्ये मुर्त्या गोळा करून एका पुलावर जातात आणि तिथून अक्षरशः त्या मुर्त्या पाण्यात वरूनच टाकून देतात, विसर्जनाच्या दिवसानंतर मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावरहि असेच दृश्य दिसते. उत्तर भारतात तर जिथे पाणी जवळ नसेल तिथे तर पिंपळाच्या खाली मूर्ती सरळ ठेवून देतात. हे सगळं बघून मन उदास होत. हे सगळं योग्य आहे का
https://youtu.be/hFCByrlKvNA 
https://youtu.be/QbLfvTztE10


मागच्या पन्नास किंवा शंभर वर्षांकडे वळून बघितले तर लक्षात येईल कि केवळ काही परिवार किंवा समुदाय जे व्रत करीत असत ते आता खूप मोठ्या प्रमाणावर एक उत्सव म्हणून साजरे केले जाते. यात अनेक जण श्रद्धेने हे करतात तर अनेक जण केवळ हौसेसाठी सुद्धा हे करतात. हे सगळंच चांगलं आहे - स्वागतार्ह आहे - पण हे नको का बघायला कि हे सगळं आपण योग्य प्रकारे करतोय कि नाही?

जर आपल्याला श्री गणेश पूजनाचे काही पुण्य मिळत असेल, काही फळ मिळत असेल तर ते आपण चुकीच्या पद्धतीने विसर्जन करून घालवून तर देत नाही ना? आणि उलट त्यामुळे आपल्याला दोष तर लागत नाही ना?

श्री गणेशाचे हे व्रत अत्यंत लाभदावक आहे, पुण्यवर्धक आहे, जे हे व्रत करतात त्यांना सुख समृद्धी मिळते, यश मिळते. परंतु चुकीच्या विसर्जनामुळे आपण या सगळ्या वर पाणी तर नाही ना टाकत?

आपल्या घरातल्या मंदिरातल्या धातूच्या मूर्तीबरोबरच केवळ भाद्रपद चतुर्थीला पार्थिव गणेशाची स्थापना केली जाते. (पार्थिव अर्थात मातीची). आणि या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळी साक्षात चैतन्य श्री गणेश यात आगमन करीत आहेत याची श्रद्धा ठेवून पूजा अर्चना केली जाते. दीड दिवसांनी, म्हणजे दुसऱ्या दिवशी दुपारी विसर्जन करण्यापूर्वी पुन्हा पूजा करून श्रद्धेने त्या मुर्तीत विराजमान असलेल्या चैतन्याला  पुन्हा पुढच्या वर्षी नक्की या हे सांगतच निरोप दिला जातो. हेच तर सुष्टीचे अनंत चक्र आहे - नाही का? पंच महाभूतांपासून आपण बनतो आणि त्यांच्यातच विलीन होतो - अगदी तसेच निसर्गापासून तयार झालेली मूर्ती पुन्हा निसर्गात पूर्णपणे एक होऊन जाते. पूर्वी काटेकोर पणे व्रत पाळले  जाई, खूप निष्ठेने सेवा केली जाई, यात कठोर साधना होती, भक्ती होती आणि प्रेमही होतेच. कालांतराने दीड दिवसाचा गणपती कुठे तीन तर कुठे पाच तर कुठे सात तर कुठे दहा दिवसांचा झाला - यात ज्याच्या त्याच्या परंपरा, पद्धती आणि श्रद्धा होती. गौरीपुत्र श्री गणेश मात्र कुणी किती दिवस पूजा केली किंवा कशी केली यापेक्षा किती श्रद्धेने मनापासून केली यालाच महत्व देतात आणि सर्व खऱ्या भक्तांची रक्षा करतात त्यांना आशीर्वाद देतातं, यश देतात.

आज पण आपण त्याच श्रद्धेने, भक्तीने, प्रेमाने पूजा करतो का? मला वाटत हो आपण करतो. आपल्या सर्वांचाच श्री गणेशावर आणि आपल्या हिंदू धर्मावर नितांत विश्वास आहे, मग आपण चांगल्या बदलावासाठी पुढाकार का नाही घेत?

आपण सगळे श्रींच्या सन्मानपूर्वक विसर्जनाचा आग्रह का नाही करत. मोठं मोठ्या मुर्त्यांचा आग्रह का? त्या वर केमिकलचा रंगांचा आग्रह का? आणि मग त्या मुर्त्या आपण नदीत, समुद्रात, तलावात टाकणार, अगदी अशुद्ध पाण्यातही आणि पिंपळाच्या झाडाखालीही ठेवणार, पुलावरून टाकणार, सरकारी कर्मचारी कसेही विसर्जन करणार. हे सगळं योग्य आहे का?

आपल्या श्रींच्या उत्सवात काहीही कमी करायची नाहीये - उत्साह वाढवणारा तो ढोल वाजू देत, सुंदर रांगोळ्यांनी धरती सजू देत, विविध प्रकारचे पक्वान्न नैवेद्याला होऊ देत, पूजा होऊ दे, होम हवन होऊ दे, आरत्या तर हव्याच, कलेच्या प्रदर्शनाला वाव मिळू देत, फक्त विसर्जन करताना चुकूनही प्रतिमेचा अपमान होता कामा नये, जल प्रदूषणही नकोच, प्रतिमा बनवणारे आणि विकणारे यासाठी काही पुढाकार घेतील का? चुकीच्या विसर्जनाचा दोष त्यांच्या माथी लागेल का?

फक्त पर्यावरणासाठीच नाही तर त्या प्रतिमेच्या सन्मानासाठी सुद्धा इको फ्रेंडली - पर्यावरणपूरक मूर्तींची गरज आहे - अधिकाधिक लोक गणेश स्थापना करू लागले आहेत - त्या सर्वानीच श्रींचे अथर्वशीर्ष शिकावे, या अथर्वशीर्षाचे सामुदायिक पठण गावोगावी व्हावे, त्या बरोबरीनेच आरत्या, भीमरूपी आणि समाज प्रबोधन असे सर्व व्हावे, पण कुठल्याही परिस्थितीत  श्रींच्या प्रतिमेचे योग्य प्रकारेच विसर्जन झाले पाहिजे,

पुढाकार आपण सर्वानीच घेतला पाहिजे, आपल्या घरापासूनच सुरवात केली पाहिजे - अशी मूर्ती आणून जी निसर्गात पूर्णपणे मिसळून जाईल - पर्यावरणाला कुठल्याही प्रकारे दूषित करणार नाही, अशा मूर्तींचे घरीच शुद्ध पाण्यात फुले टाकून आणि चंदन टाकून विसर्जन करावे, नंतर ते पवित्र पाणी आणि माती आपल्या बागेत किंवा आस पासच्या झाडांमध्ये टाकून द्यावी जेणेकरून झाडांच्या, फुलांच्या, फळांच्या आणि सावलीच्या रूपात श्री गणेश आपल्याला सदैव आशीर्वाद देत राहतील. जिथे जिथे आपल्याला चुकीच्या पद्धतीने विसर्जन होताना दिसेल तिथे तिथे आपण योग्य प्रकारे विसर्जन करण्याचा आग्रह, विनंती करू.

मी जेव्हा जेव्हा असे व्हिडिओ आणि फोटो बघतो तेव्हा मला प्रश्न पडतो कि का कुणीच या बद्दल बोलत नाही.

चितळ्यांची जाहिरात म्हणूनच भावते, सीड बॉल्स आणि शुद्ध मातीतुन बनलेली श्रींची मूर्ती बसवून नंतर त्याचे विसर्जन करून - त्यांना कुंड्यांतून सांभाळायचे आणि झाडं मोठी झाल्यावरहि त्यांना जोपासायचे - मला हि खूपच सुंदर अध्यात्मिक आणि सहज सोपी गोष्ट वाटली. आणि म्हणूनच हि जाहिरात हृदयाला भिडते.

भारताने आणि आपल्या सनातन हिंदू धर्माने अनेक आक्रमणे झेलली पण आपले अस्तित्व टिकवून ठेवले - यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे आपले अध्यात्म आणि आपली बदल स्वीकारायची क्षमता. जर आपली श्रद्धा भक्ती खरी आहे तर आपण सन्मानपूर्वक विसर्जनाचा आग्रह का नाही करू शकत?

श्री गणेश तर कणा कणात आहेत, आई वडिलांच्या सेवेची प्रेरणा ते देतात, श्री गणेश आपल्याला नेतृत्व गुण शिकवतात, आपल्या प्रत्येक आनंदाचा, उत्साहाचा आणि आपल्या उज्वल भविष्याचा शुभारंभ हा नेहमी श्री गणेश पूजनानेच होतो, होत राहिला आहे आणि होतच राहील...

चला आपणही योग्य रीतीने सन्मानपूर्वक विसर्जनाचा श्री गणेशा करूयात....


--------------------------------------------
HINDI
--------------------------------------------

चितले विज्ञापन, सन्मानपूर्वक विसर्जन .... एक नयी शुरुवात

श्री गणेशजी का उत्सव भारत में और विशेषतः महाराष्ट्र में बहोतही धूमधाम से मनाया जाता है, इतनाही नहीं जहा जहा सनातन हिन्दू धर्म को मानने वाले बसते है वहा वहा गणेशोत्सव मनाया जाता है.

मेरे खुद के घर पर भी श्री गणेशजी की स्थापना होती है. इस उत्सव के साथ मेरी अनेक प्यारी यादे जुडी है. कड़ी मेहनत से कम से कम एक महीना पहलेसेही सजावट की तैयारी करना, वह सब सामान लेने बाजार के चक्कर लगाना, घर साफ़ सफाई में सारे घर वालों का एक दूसरे को मदत करना, श्री गणेश चतुर्थी के एक दिन पहले तो घर में शादियों वाला माहौल बन जाता है - हर कोई तैयारी में लग जाता है - मोदक और दूसरे नैवेद्द्य / प्रसाद की तैयारी, फूल हार बनाना, आरती की तैयारी, रंगोली, पारम्परिक पोशाख , दूर्वा, कमल, और क्या क्या....... श्री गणेशजी की मंगल मूर्ति को अपने हातों से घर लाना एक अत्यंत आनंदमयी अनुभव होता है. वह सारे दिन अलग ही होते है - वह एक के बाद एक आरतिया और प्रसाद. वह खुद के घर की आरती, पड़ोसियों के यहाँ की फिर सोसाइटी की आरती. और फिर अलग अलग पंडालों में जाकर वहा की सजावट देखना और श्री गणेशजी के अनेक रूपों का दर्शन करना.

इस उत्सव ने कितनेही नेता दिए जो बचपन से उत्सव आयोजय करके नेतृत्व करना सीखे, इस उत्सव ने अनेक कलाकार दिए जिन्होंने इस उत्सव के दौरान अपनी सोसाइटी में, अपनी कॉलोनी में या अपने मित्र परिवारों के सामने अपनी कला का प्रदर्शन कर प्रोत्साहन पाया और आगे बढे, इस उत्सव ने शुरू से ही समाज के कल्याण का, समाज की एकता का काम किया.

केवल कुछ परिवारों में, या समुदाय में मनाया जाने वाला यह पारम्परिक व्रत लोकमान्य तिलक ने सार्वजनिक कर दिया. परतंत्र के काल में ब्रिटिश लोग हम भारतीयोंपर अनेक पाबन्दी लगाते थे. लोगों को इकठ्ठा कर क्रांति की, आज़ादी की बात करना भी मुश्किल था किन्तु श्री लोकमान्य तिलक ने श्री गणेश उत्सव को सार्वजनिक कर इस उत्सव के अवसर पर एकत्रित हुए सभी भारतीय जनता के मन में क्रांति की ज्योति जलाई, सब को आज़ादी पर बात करना और उसके लिए काम करने पर प्रेरित किया.

लेकिन, पिछले कुछ वर्षो से यह उत्सव बदल रहा है, बदलाव एक अनंत कभी ना थमने वाली चीज़ है. कुछ बदलाव अच्छे होते है तो कुछ बुरे. इस उत्सव के भी हजारों अच्छे अंग है तो कुछ ऐसी बाते है जिन पर हमें सोच विचार करना चाहिए और अच्छा बदलाव लाना चाहिए. सबसे दुःख दायक अगर कोई बात है तो वह ये की गलत तरीके से हो रहा विसर्जन.

यह बात अत्यंत संवेदनशील है.

मेरा किसी की भी धार्मिक भावनाओ को दुखाने का उद्देश्य नहीं है. मै खुद ही दुखी हूँ, आहत हूँ. इसका कारण यह है की पिछले कुछ सालों से हम सब विसर्जन के गलत तरीको को देख रहे है. हर वर्ष गणेश उत्सव के दौरान या बाद में विचलित करने वाली तस्वीरें आती है, वीडिओज़ शेयर किये जाते है. मैंने एक वीडियो देखा था जहा म्युनिसिपल कारपोरेशन के कर्मचारी सारी गणेश प्रतिमाओंको एक ट्रक में डाल कर एक पूल पर ले गए और वहा से उन्होंने प्रतिमाये नदी में डाल दी. मुंबई के समुद्रतटपरभी विसर्जन के बाद ऐसे ही दृश्य देखने मिलते है जहा प्रतिमाये टूटी हुई अवस्था में पड़ी रहती है. नदी या तालाब के किनारो पर भी ऐसा ही मिलता जुलता दृश्य दिखाई देता है. उत्तर भारत में तो अगर पानी आस पास नहीं है तो सीधे किसी पीपल के पेड़ के निचे इन प्रतिमाओंको छोड़ दिया जाता है. और यह सब देख कर मेरा मन विचलित हो जाता है. क्या यह सही है?
https://youtu.be/hFCByrlKvNA 
https://youtu.be/QbLfvTztE10

अगर हम पिछले पचास या सौ वर्षो को देखे तो यह साफ़ दिखेगा की श्री गणेश उत्सव जोकि एक व्रत है, एक पूजा है जो कुछ परिवार या समुदाय अपनी परंपरा के अनुसार मनाते  थे वही व्रत आज बहोत ज्यादा लोग अपनी श्रद्धा, अपनी ख़ुशी के लिए मनाते  है - यह अच्छी बात तो है लेकिन यह देखना जरुरी है की क्या हम इसे सही रूप से और सही तरीके से मना रहे है या नहीं?

अगर हमे श्री गणेश के पूजन का पुण्य मिलता है, फल मिलता है तो क्या हम गलत तरीके से विसर्जन कर के कही उस फल को खो तो नहीं देते? क्या हमे दोष तो नहीं लगता.

श्री गणेश का यह व्रत बहोत ही लाभदायक है, पुण्यदायक है - जो ये करते है उन्हें बरकत ही मिलती है, यश मिलता है, उनके भंडारे भर जाते है. पर कही गलत तरीके के विसर्जन से हम अपनी पूजा पर पानी तो नहीं फेर देते?

अपने घर में जो मंदिर में गणेश जी की धातु की प्रतिमा होती है उसके साथ ही - केवल इस उत्सव के दौरान भाद्रपद चतुर्थी को पार्थिव गणेश प्रतिमा की स्थापना की जाती है  (पार्थिव अर्थात मिटटी से बनी हुई) और इस प्रतिमा में प्राण प्रतिष्ठा के बाद श्री गणेशजी के चैतन्य रूप के आगमन की भावना रखते हुए उनकी श्रद्धा पूर्वक पूजा अर्चना की जाती है, डेढ़ दिन के बाद मतलब दूसरे दिन माधान्य में विसर्जन होता है, विसर्जन के पूर्व इस प्रतिमा की पूजा की जाती है इस भावना से की जो चैतन्य इस प्रतिमा में विराजित है वह हमें आशीर्वाद देकर अब वापस जा रहा है, अगले साल फिर से लौट आने के लिए - यही तो सृष्टि का चलन है - अनंत चक्र है. पंच महाभूतों से हम सब बने है और अंत में हम उन्ही पंचमहाभूतों में विलीन हो जाते है - वैसे ही निसर्ग से ही वह प्रतिमा बनती है और निसर्ग में ही विलीन हो जाती है, पूर्वकाल में इस व्रत को मनाने वाले कड़े नियमो का पालन करते थे ताकि पूजा में कोई त्रुटि ना रहे और पूरी ईमानदारी, निष्ठां से वह इस व्रत को पूरा करते थे, इसमें अपार श्रद्धा, भक्ति और प्रेम होता था. कालांतर से डेढ़ दिन का व्रत कई लोग तीन का, पांच दिन का, सात दिन का या दस दिन के त्यौहार के रूप में मनाने लगे. जो की अपनी श्रद्धा और परंपरा के अनुसार ही है. श्री गणेशजी तो लोकनायक है - गौरीपुत्र यह नहीं देखते की कितने दिन उत्सव मनाया, कैसे मनाया वह तो श्रद्धा देखते है और अपने सच्चे भक्तो को हमेश आशीष देते है, यश देते है - उनकी रक्षा करते है.
क्या आज भी हम सब में वही प्रेम, श्रद्धा, भक्ति है? मेरा मानना है की अवश्य है. हम सब आज भी श्री गणेशजी और हमारे सनातन हिन्दू धर्म में अपार श्रद्धा विश्वास रखते है. फिर कुछ अच्छे बदलाव के लिए हम कुछ क्यों नहीं करते?

क्या हम सब श्री गणेश के सन्मान पूर्वक विसर्जन के लिए कुछ नहीं कर सकते? हम क्यों जिद करते है बड़ी बड़ी प्रतिमाओंकी? उन पर लगे केमिकल से भरे रंगो की? और फिर उन्ही प्रतिमाओंको हम नदी में, तालाब में, सागर में, यहाँ तक की अशुद्ध पानी में - पीपल के निचे रख देते है, पूल पर से निचे दाल देते है, सरकारी कर्मचारी उन्हें ठीक से नहीं विसर्जित करते है  - क्या यह सही है?

हमें श्री गणेश उत्सव में कोई कमी नहीं रखनी चाहिए, ढोल हो - रंगोली हो - तरह तरह के पकवान हो - पूजा हो - हवन हो - आरती हो - कला प्रदर्शन हो - पर विसर्जन के नाम पर प्रतिमाओं का अपमान ना हो - जल का प्रदुषण ना हो. प्रतिमाओं के व्यवसाय करनेवाले क्या प्रतिमा विसर्जन की जिम्मेदारी लेंगे? क्या वह गलत तरीके से होने वाले विसर्जन का दोष अपने माथे पर लेंगे?

प्रतिमाये इको फ्रेंडली होना केवल पर्यावरण के लिए जरुरी नहीं है - उन प्रतिमाओं का उन मूर्तियोंका अपमान ना हो इसलिए भी जरुरी है. ज्यादा से ज्यादा लोग श्री गणेश की स्थापना करने लगे है, उन सबको श्री गणेश अथर्वशीर्ष सीखना चाहिए, श्री गणेश अथर्वशीर्ष का सामुदायिक पठन हर एक गांव और शहर में होना चाहिए, साथ ही मै आरती, हनुमान चालीसा और समाज प्रबोधन की भी बाते हो, पर किसी भी हालत में श्री प्रतिमाओंका गलत तरीके से विसर्जन ना हो.

पहल हम सब को करनी है. प्रथम अपने घर में हमें यह निश्चित करना है की हम इको फ्रैंडली याने पूरी तरह से निसर्ग में वापिस विलीन होने वाली - पर्यावरण को किसी भी तरह से  हानि ना पहुंचने वाली ही मूर्ति लाएंगे. और अपने घर के शुद्ध अभिमंत्रित फूल और चन्दन डाले हुए पानी में ही विसर्जन करेंगे. बाद में उस पवित्र मिटटी और पानी को अपने बाग़ में या आस पास के पेड़ो में डाल देंगे जिससे श्री गणेश उन पेड़ पौधों, फूलो फलो में से हमें सदा आशीर्वाद देते रहे - अपनी कृपा छाया हम पर बरसाते रहे. और जहा जहा गलत तरीके से विसर्जन हो रहा है वहा हम प्रार्थना करेंगे, आग्रह करेंगे की सही तरीके से विसर्जन करे.

जब जब मै ऐसे वीडिओज़ या फोटो देखता हु जहा पर अत्यंत गलत तरीके से विसर्जन हो रहा है तब तब दुःख होता है और लगता है की क्यों कोई कुछ नहीं कहता?

चितले बंधू मिठाईवाले इनका बहोत ही सुन्दर विज्ञापन है, जहा पर सीड बॉल्स से भरी शुद्ध मिटटी की गणेश प्रतिमा बिठाकर पूजा के बाद विसर्जन कर उस मिट्टी को गमलों में संभाल कर रखने की बात की गयी है, और फिर उसमे से उगे पेड़ों को संजोये रखना एक बहोत ही बड़ी अध्यात्म पूर्ण, पर्यावरणप्रेमी - सहज और सुन्दर बात है - जो मन को छू लेती है.

भारत ने और हमारे सनातन हिन्दू धर्म ने कितने आक्रमण झेले है, फिर भी हमारी हस्ती, हमारा अस्तित्व नहीं मिटा, इसका सबसे बड़ा कारण है हमारा अध्यात्म और हमारी बदलाव को अपनाने की क्षमता - अगर हम सच्ची श्रद्धा भक्ति रखते है तो क्या हम सही तरीके से सन्मान पूर्वक विसर्जन का आग्रह नहीं कर सकते?

श्री गणेश तो कण कण में है, उनसे हमें माता पिता की सेवा की प्रेरणा मिलती है, उनसे हमें नेतृत्व की सीख मिलती है. हमारे हर उत्साह का, हमारे हर आनंद का और हमारे सब के उज्वल भविष्य का शुभारंभ ही श्री गणेश पूजन से होता है, होता रहा है और आगे भी होता रहेगा.....

चलिए हम सही तरीके से सन्मान पूर्वक विसर्जन का श्री गणेश करे.....

काला पानी

हम सभी लॉक डाउन में बंद है. ये सही समय है जानने का , सोचने का उनके बारे में जिन्हे पुरे जीवन के लिए लॉक डाउन किया गया था. वो भी ए...